हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार 28 ते 30 जानेवारी राज्यात दुखवटा; शासकीय कार्यालयांना सूचना

On: January 28, 2026 3:21 PM
Follow Us:
अजित पवार निधन घोषित केल्याचा उल्लेख असलेले शासकीय पत्र

बुलढाणा|२८ जानेवारी २०२६

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने जारी झालेल्या एका शासकीय पत्रानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाल्याचे नमूद करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत दुखवटा पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पत्रात शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सदर कालावधीत कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 28 जानेवारी 2026 रोजी सर्व शासकीय कार्यालये व आस्थापना बंद राहतील, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सदर पत्रात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाचा उल्लेख असून दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी जारी केल्याचे नमूद आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून विविध शासकीय कार्यालयांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या पत्रानुसार दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी अनेक ठिकाणी करण्यात येत असल्याचेही सांगितले जात असून नागरिकांकडून याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात पुढील अधिकृत आदेश किंवा शासनाकडून स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास त्याची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यात येईल.

हे पण वाचा..

ajit pawar death news : बारामती विमान अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन – सूत्रांची माहिती

“सिकलसेलमुक्त भविष्यासाठी रक्तचाचणी गरजेची!” – ना. प्रतापराव जाधव यांचे आवाहन

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment