हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अनाठायी खर्चामुळे शेतकरी अडचणीत! फुलेंचे विचारच आहेत उपाय – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा संदेश

On: April 9, 2026 9:29 PM
Follow Us:
महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना प्रतापराव जाधव साखरखेर्डा

साखरखेर्डा | ९ एप्रिल २०२६

महात्मा ज्योतिबा फुले, सत्यशोधक चळवळ, शेतकरी समस्या आणि सामाजिक क्रांती या मुद्द्यांवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेले भावनिक आणि प्रभावी भाषण सध्या चर्चेत आहे. अनाठायी खर्च, कर्जबाजारी शेतकरी आणि अंधश्रद्धा यावर त्यांनी कडक शब्दांत भाष्य करत समाजाला मोठा संदेश दिला. फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमात सत्यशोधक विचारांची गरज आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समाज अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभारली. त्या काळात त्यांनी समाजातील चुकीच्या प्रथा, अनाठायी खर्च आणि दिखावूपणावर कठोर टीका केली. आजही हेच विचार समाजासाठी मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन जाधव यांनी केले.सत्यपाल महाराज सध्या आपल्या प्रवचनातून आणि कीर्तनातून समाजप्रबोधन करत असून, तेच कार्य पूर्वी महात्मा फुले करत होते. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाने आपल्या उत्पन्नाच्या पलीकडे खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात अनेकदा लग्न, समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी कर्ज काढले जाते. ही चुकीची प्रवृत्ती थांबवणे गरजेचे आहे. पूर्वी अनेक लग्न केवळ चहा-शरबतावर, साध्या पद्धतीने पार पडत होती. फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी साधेपणाचा स्वीकार केला होता.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. आजही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो, त्यामागे अनाठायी खर्च आणि सामाजिक स्पर्धा हे मोठे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर गरीब, दलित आणि वंचितांसाठी काम केले. त्यांनी देशाला संविधान दिले. मात्र, त्यांचे विचार आचरणात आणणारे लोक कमी असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी योगेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, महेंद्र पाटील, कमलाकर गवई, सुनील जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


📢 तुमचे मत काय?

फुले-आंबेडकरांचे विचार आजच्या समाजात किती आवश्यक आहेत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.


👉 Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे पेट्रोल पंपावरील इंधन साठ्याची तपासणी करताना

इंधन साठेबाजी आढळली तर थेट परवाना रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना इशारा

रेती माफियांच्या हल्ल्यानंतर पत्रकार रामदास कहाळे प्रकरणावर साखरखेर्ड्यात निषेध

रेती माफियांचा पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; साखरखेर्ड्यात निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी

खामगावातील पेट्रोल पंपावर तलवार आणि कोयत्यासह आरोपींकडून दहशत

कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याने तलवार-कोयत्यासह पेट्रोल पंपावर दहशत; कर्मचाऱ्यांना मारहाण

बुलढाण्यात हरभरा भरलेला ट्रक गायब प्रकरणात LCB ने ५ आरोपींना अटक केली

२७० क्विंटल हरभरा घेऊन ट्रक गायब! बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई; ५ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदखेडराजा येथे LIVE वार्तांकन करताना पत्रकारावर हल्ला झाल्याचा आरोप

वाळू माफियांविरोधात LIVE वार्तांकन करताना पत्रकाराला मारहाण? दोषींना अटक करा, नाहीतर आंदोलन — पत्रकार संघटनांचा अल्टिमेटम

अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी जप्त केलेली पिस्तूल, काडतुसे आणि XUV500 वाहन

बुलढाण्यात रायपूर पोलिसांची मोठी कारवाई; 2 पिस्तूल, 94 काडतुसे आणि XUV500सह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment