प्रतिनिधी | चिखली |विशाल गवई
चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे घडलेल्या कथित मारहाण प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील पीडित उषा रमेश साळवे यांच्या कुटुंबीयांची सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन 24 तासांच्या आत संबंधित आरोपींना अटक करावी, तसेच कायद्यानुसार योग्य कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित जमीन वादाचीही निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाई खरात यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत सांगितले की, “24 तासांत योग्य कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह संबंधित पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल.”
या प्रकरणात काही गंभीर आरोपही करण्यात आले असून, त्यांची सत्यता तपासणे आणि कायदेशीर कारवाई करणे हे संबंधित तपास यंत्रणांचे काम असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी प्रकाश भाई धुडळे, सिद्धांत वानखेडे, प्रा. पठाण सर, दिलीप काकडे सर, वंदना वाघ, हिम्मतराव जाधव, संदीप गवई, प्रकाश पाटील, अशोक खरात, सचिन भाऊ, परमेश्वर साळवे, सलीम पठाण, राणा मोरे, आश्विन लहाने यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.
या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
👉 KattaNews.in वाचकांसाठी
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, शेती, सरकारी योजना, राजकारण आणि स्थानिक घडामोडींचे अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.










