हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण!

On: November 12, 2025 10:35 PM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा/विशाल गवई, दि. 11 (जिमाका): ३८ वर्षांनंतर राज्याच्या कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले. ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या घोषवाक्याचे आणि नव्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य अनावरण सोहळ्यात बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

“हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ” — दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “महाराष्ट्राची शेती परंपरागत असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे ‘नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ’ आहे.”

३८ वर्षांपूर्वीचे बोधचिन्ह आता झाले इतिहासजमा

भरणे यांनी सांगितले की, “कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार झाले होते. या काळात शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती आणि हवामानबदलामुळे मोठे परिवर्तन झाले. त्यामुळे विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करणे गरजेचे झाले होते.”

यासाठी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती आणि जनतेकडून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातूनच आज राज्याच्या कृषी विभागाला नव्या युगाचे प्रतीक असलेले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले आहे.

👉 महाराष्ट्रातील शेती, कृषी योजनांबाबत आणि शेतकरी अपडेटसाठी KattaNews.in वर दररोज भेट द्या.

🔗 Related News:

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे १ एकर गव्हाचे पीक जळून खाक

महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका! वरोडी येथे विधवा शेतकरी महिलेचा १ एकर गहू जळून खाक

मानोरा तालुक्यात मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रमात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! मानोरा तालुक्यात “मेरी पॉलिसी मेरे हाथ” उपक्रम; पिक विमा व पशुधन विम्याबाबत मार्गदर्शन

Maharashtra Weather Alert heavy rain forecast by Punjabrao Dakh from 17 to 20 March

Maharashtra Weather Alert : 17 ते 20 मार्च राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा इशारा

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

पांगरी काटे येथील संकेत इंगळे यांची TA Army मध्ये निवड

बस चालकाच्या मुलाची मोठी कामगिरी! पांगरी काटे येथील संकेत इंगळे ‘TA Army’ मध्ये निवड

साखरखेर्डा सोलारपंप योजना गोंधळामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले

मागेल त्याला सोलारपंप योजनेचा बोजवारा! ऑनलाईन अर्जाच्या गोंधळात साखरखेर्ड्यात शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले

Leave a Comment