हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Follow Us:
Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मुंबई |१७ मार्च २०२६

 इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धपरिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. राज्यात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गॅस टंचाईवर तोडगा म्हणून आता राज्यातील पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली.

जागतिक परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने केरोसीन विक्रीचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या सहकार्याने राज्यातील पेट्रोल पंपांवर केरोसीन विक्री करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना इंधनाचा पर्याय मिळणार असून गॅस टंचाईचा काही प्रमाणात परिणाम कमी होण्याची शक्यता आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले की, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन वितरणाबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. वितरण साखळीत अडथळे निर्माण झाल्यामुळे पेट्रोल पंपांमार्फत विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात गॅस उत्पादनातही वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यातील उत्पादन ९ हजार मेट्रिक टनांवरून वाढवून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.

याचबरोबर राज्यात खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाल्याचेही सरकारने मान्य केले आहे. विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान विविध खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली आहे.

शेंगदाणा तेलाचा दर प्रतिकिलो १८८.२१ रुपयांवरून १९४.३२ रुपयांपर्यंत वाढला आहे. राई तेल २००.६७ रुपयांवरून २०४.२२ रुपये, वनस्पती तेल १६०.४७ रुपयांवरून १६०.६३ रुपये, सोया तेल १५३.६३ रुपयांवरून १५९.३२ रुपये आणि सनफ्लॉवर तेल १७२.१६ रुपयांवरून १७८.०५ रुपये प्रति किलोपर्यंत महागले आहे. तसेच पामतेलाचा दरही १४५.६० रुपयांवरून १४८.६० रुपयांपर्यंत वाढल्याचे सरकारने स्पष्ट केले.


Related News


हे आवश्यक करा : अशाच महत्त्वाच्या आणि वेगवान अपडेटसाठी KattaNews.in नियमित वाचा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment