समाधान सरकटे/सिंदखेडराजा
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावा आणि शेतीसाठी पाण्याची अडचण दूर व्हावी, यासाठी शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली. मात्र प्रत्यक्षात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अनेक शेतकऱ्यांसाठी फक्त कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज करूनही दोन वर्षांपासून लाभ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना प्रभावीपणे राबवण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
हे पण वाचा..
“शासनाने चांगली योजना आणली, पण अंमलबजावणीच होत नसेल तर शेतकऱ्यांनी अपेक्षा कुणाकडून करायच्या?” असा सवाल मदन वीर यांनी उपस्थित केला आहे. महावितरणने तातडीने अर्जाचा विचार करून पारेषण विरहित कृषी सौर पंप बसवून विजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
📌 शेतकऱ्यांची प्रमुख मागणी
- प्रलंबित अर्जांची तातडीने चौकशी
- पारेषण विरहित सौर कृषी पंप त्वरित बसवणे
- उशिरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई
👉 हे आवश्य करा..
तुमचाही सौर कृषी पंप अर्ज प्रलंबित आहे का?
अशा समस्या तुमच्या परिसरात असतील तर Kattanews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवू.
🔗 हे पण वाचा..















