साखरखेर्डा | ९ मार्च २०२६
महात्मा ज्योतिबा फुले, सत्यशोधक चळवळ, शेतकरी समस्या आणि सामाजिक क्रांती या मुद्द्यांवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेले भावनिक आणि प्रभावी भाषण सध्या चर्चेत आहे. अनाठायी खर्च, कर्जबाजारी शेतकरी आणि अंधश्रद्धा यावर त्यांनी कडक शब्दांत भाष्य करत समाजाला मोठा संदेश दिला. फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमात सत्यशोधक विचारांची गरज आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात अनेकदा लग्न, समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी कर्ज काढले जाते. ही चुकीची प्रवृत्ती थांबवणे गरजेचे आहे. पूर्वी अनेक लग्न केवळ चहा-शरबतावर, साध्या पद्धतीने पार पडत होती. फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी साधेपणाचा स्वीकार केला होता.
महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. आजही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो, त्यामागे अनाठायी खर्च आणि सामाजिक स्पर्धा हे मोठे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर गरीब, दलित आणि वंचितांसाठी काम केले. त्यांनी देशाला संविधान दिले. मात्र, त्यांचे विचार आचरणात आणणारे लोक कमी असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी योगेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, महेंद्र पाटील, कमलाकर गवई, सुनील जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📢 तुमचे मत काय?
फुले-आंबेडकरांचे विचार आजच्या समाजात किती आवश्यक आहेत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
👉 Related News










