वाशिम| १६ जानेवारी २०२६
या मारहाण प्रकरणानंतर आता आणखी गंभीर खुलासा समोर आला आहे. स्वतःची चूक झाकण्यासाठी कृषी विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ऋषिकेश पवार याला ‘विनयभंग व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी’ दिली जात असल्याचे खुद्द पीडित शेतकऱ्याने सांगितले.
१५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनात ऋषिकेश पवार म्हणाला, “मला बुटाने मारहाण झाली ते पुरेसे नव्हते का? आता माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. मी न्याय कोणाकडे मागायचा?”
या प्रकारानंतर शेतकरी नेते दामू अण्णा इंगोले यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्याच्या अस्मितेशी खेळ करणाऱ्या मग्रूर अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा वाशिमचा बळीराजा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
हे पण वाचा..
वाशिम महसूल विभागात खळबळ! 10 हजारांची लाच घेताना तलाठी ACBच्या जाळ्यात
दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे मंत्री या गंभीर प्रकरणात मौन बाळगणार की कठोर कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
👉 KattaNews.in वर तुमचे मत नोंदवा
शेतकऱ्याला मारहाण करून खोट्या गुन्ह्यांची धमकी देणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.











