साखरखेर्डा |२२ मार्च २०२६
साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष शंकर खरात (वय ४७) यांनी राहत्या घरात पंख्याला दोर लावून गळफास घेत आपले जीवन संपवले. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान आणि वाढता कर्जाचा ताण यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
ही हृदयद्रावक घटना २१ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. संतोष खरात यांच्याकडे सुमारे १ हेक्टर ६२ आर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता. आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतीसाठी बँकेतून कर्ज काढून पेरणी करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत गेल्या आणि संतोष खरात मानसिक तणावाखाली होते.
विशेष म्हणजे, त्यांच्या एका मुलीचा विवाह अवघ्या एका महिन्यापूर्वी झाला होता. अशा परिस्थितीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. संतोष खरात हे मनमिळावू आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व्यक्ती होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे यांनी प्राथमिक अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांना सादर केला आहे. तसेच ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
📢 Related News
- मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?
- सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर
- मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का
📢 हे आवश्यक करा
👉 अशा महत्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.
👉 ही बातमी शेअर करून इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.











