हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

५०-६० वर्षे राहूनही न्याय नाही! चिखलीतील कुटुंबांचा आक्रोश, बावनकुळे यांच्याकडे मोठी मागणी

On: April 22, 2026 3:02 PM
Follow Us:
चिखली मातंगपुरा अतिक्रमण नियमितीकरण व घरकुल योजना मागणी

चिखली |विशाल गवई

चिखली शहरातील मातंगपुरा, पोलीस लाईनलगत व एकता नगर येथील रहिवाशांनी अतिक्रमण नियमितीकरण, घरकुल योजना आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अद्याप जमीन हक्क मिळाले नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते छोटु कांबळे यांनी हा प्रश्न पुढे आणत चिखली तहसील कार्यालयात निवेदन दिले. यावेळी प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन निर्णय असूनही त्यांना अजूनही घरकुल, रस्ते, पाणी व स्ट्रीट लाईट यांसारख्या सुविधा मिळालेल्या नाहीत.

निवेदनात नमूद करण्यात आले की, या भागातील अनेक कुटुंबे दशकांपासून राहत असूनही त्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. त्यामुळे नगर परिषद विकास आराखडा बदलून संबंधित जागेवरील आरक्षण रद्द करून नागरिकांना अधिकृत हक्क द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा शासनाचा निर्णय असताना देखील या रहिवाशांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तातडीने अतिक्रमण नियमित करून घरकुल योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

“अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणे हा मोठा अन्याय आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी भावना छोटु कांबळे यांनी व्यक्त केली.

👉 अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp ग्रुप जॉईन करा!

Related News:

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

भोंदू खरात प्रकरणावर श्याम मानव यांनी बुलढाण्यात घेतलेली पत्रकार परिषद

Breaking: ‘भोंदू खरातला सरकारचं संरक्षण?’ – फडणवीस सरकारवर श्याम मानवांचा स्फोटक हल्ला

मेहकर क्राईम न्यूज खून प्रकरण पोलिस तपास जेसीबी उत्खनन सांगाडा सापडला

४ वर्षांनंतर उलगडला थरार! मेहकरमध्ये मिसिंग केसचा खून म्हणून धक्कादायक उलगडा, २ आरोपी अटकेत

साखरखेर्डा जिजामाता विद्यालयात जखमी झालेला सातवीचा विद्यार्थी

राक्षसी प्रवृत्ती! साखरखेर्डा जिजामाता विद्यालयात शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्याचे डोके डेस्कवर आपटले

खैरव-बारलिंगा ग्रामसभेत अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर गुलाल उधळून आनंद व्यक्त करताना नागरिक

Big Update: 190 मतांनी पलटला खेळ! ग्रामसभेत नलिनी गरड यांना जनतेचा कौल, अविश्वास ठराव नामंजूर

बुलढाणा येथे झालेल्या पटवारी संघाच्या सभेत विजेंद्र धोंडगे यांची सलग ९वी निवड

बुलढाणा Breaking: विजेंद्र धोंडगे यांची सलग ९वी निवड, ‘ट्रिपल हॅट्ट्रिक’; वाकदकरांची सचिवपदी ‘हॅट्ट्रिक’

बुलढाणा मध्ये मंत्री बावनकुळे यांनी चिखली प्रांत अधिकाऱ्यावर कारवाई

मंत्री बावनकुळेंचा तडकाफडकी निर्णय! चिखली प्रांत अधिकारी सक्तीच्या रजेवर, बुलढाण्यात खळबळ – नेमकं काय घडलं?

Leave a Comment