चिखली |विशाल गवई
चिखली शहरातील मातंगपुरा, पोलीस लाईनलगत व एकता नगर येथील रहिवाशांनी अतिक्रमण नियमितीकरण, घरकुल योजना आणि मूलभूत सुविधा मिळण्यासाठी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अद्याप जमीन हक्क मिळाले नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, या भागातील अनेक कुटुंबे दशकांपासून राहत असूनही त्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. त्यामुळे नगर परिषद विकास आराखडा बदलून संबंधित जागेवरील आरक्षण रद्द करून नागरिकांना अधिकृत हक्क द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा शासनाचा निर्णय असताना देखील या रहिवाशांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तातडीने अतिक्रमण नियमित करून घरकुल योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
“अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणे हा मोठा अन्याय आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी भावना छोटु कांबळे यांनी व्यक्त केली.
👉 अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp ग्रुप जॉईन करा!
Related News:










