चिखली प्रतिनिधी/विशाल गवई
भीमा कोरेगाव शौर्यदिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून समता, बंधुता आणि न्यायाची प्रेरणा देणारा दिवस आहे. भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या निमित्ताने महार सैनिकांनी पेशव्यांच्या अन्यायकारक वर्णव्यवस्थेविरोधात दिलेला लढा हा सामाजिक क्रांतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले. भीमा कोरेगाव शौर्यदिन नव्या पिढीला आत्मसन्मान आणि संघर्षाची दिशा देतो, असेही त्यांनी सांगितले.
राहुलभाऊ बोंद्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भीमा कोरेगावचा लढा हा इंग्रज विरुद्ध पेशवे एवढाच मर्यादित नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा आहे. आजही संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवून वैचारिक लढा लढणे गरजेचे आहे.
हे पण वाचा..
पिंप्री गवळीत काळजाला चटका! घरातच १५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, माजी सैनिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शौर्यगाथा व मार्गदर्शन कार्यक्रमातून उपस्थितांना सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली. प्रत्यक्ष भीमा कोरेगाव येथे जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
📢 तुमचे मत नोंदवा
भीमा कोरेगाव शौर्यदिनाबाबत तुमचे विचार आम्हाला कमेंटद्वारे कळवा. अशाच सामाजिक व राजकीय बातम्यांसाठी KattaNews.in ला फॉलो करा.












