हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

६७ लाखांची पाणी योजना फेल! मंगरूळ ग्रामस्थांचा संताप — तहानलेल्या गावाचा आमरण उपोषणाला सुरुवात

On: May 6, 2026 7:42 AM
Follow Us:
मंगरूळ गावातील पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

चिखली |समाधान सरकटे 

दोन वर्षांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या मंगरूळ गावातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या तब्बल ६७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेनंतरही गावात थेंबभर पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय, चिखली समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. “पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

माहितीनुसार, सन २०२१ मध्ये मंगरूळ गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे आणि वीज कनेक्शन देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

ग्रामस्थांच्या मते, ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे पाईपलाईन चुकीच्या व बुडीत क्षेत्रातून टाकण्यात आली. त्यामुळे वारंवार गळती होत असून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. लाखो रुपये खर्चूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी अजूनही वणवण भटकंती करावी लागत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली होती. तसेच ५ मेपासून उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे महिलांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“शासनाचा पैसा अक्षरशः पाण्यात गेला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तात्काळ शाश्वत पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे.


👉 Related News


📢 हे नक्की करा..

तुमच्या परिसरातील अशाच समस्यांबाबत आम्हाला कळवा. तुमची बातमी थेट Kattanews.in वर प्रसिद्ध केली जाईल.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांनी निक्षय मित्र म्हणून टीबी रुग्ण दत्तक घेतल्यावेळी

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा मोठा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

Leave a Comment