हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला काकड पुतळा वाद पेटला; शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा

Follow Us:
चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वादामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा|२३ फेब्रुवारी २०२६

लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरणामुळे वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठविल्याने बुलढाणा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशी संबंधित वादामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे कायंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे; मात्र सध्याच्या घडामोडींमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच वंजारी समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप करत कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी भूमिका घेतली गेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या परिस्थितीत अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक ऐक्य व समाजभावना जपण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी आपला राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी

Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि WhatsApp वर शेअर करा.


Related News

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना प्रतापराव जाधव साखरखेर्डा

अनाठायी खर्चामुळे शेतकरी अडचणीत! फुलेंचे विचारच आहेत उपाय – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा संदेश

साखरखेर्डा बस स्थानकात 5 तास उभी असलेली एसटी बस, चालक आजारी पडल्याने प्रवाशांची गैरसोय

5 तास एसटी बस थांबली… कारण ऐकून थक्क व्हाल! साखरखेर्ड्यात प्रवाशांची प्रचंड गैरसोय

गुंज मारहाण प्रकरणात ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत, सुरेश तुपकर यांचा जामीन फेटाळला

गुंज मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; ४ आरोपी न्यायालयीन कोठडीत, सुरेश तुपकरांचा जामीन फेटाळला

जळगाव जामोद येथे मानसिक छळामुळे तरुणीची आत्महत्या

धमकी, बदनामी आणि तुटलेलं लग्न… २१ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; जळगाव जामोद हादरलं

उत्रादा गावात जलजीवन योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह; टाकी गळतीनंतर ग्रामस्थांचे उपोषण सुरू

खामगाव अण्णाभाऊ साठे पुतळा आंदोलन मातंग समाज उपोषण

खामगावात अण्णाभाऊ साठे पुतळा वाद पेटला; आमदार अमित गोरखे यांचा अल्टिमेटम, 5 दिवसांत निर्णय नाही तर आझाद मैदानावर उपोषण

Leave a Comment