हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकऱ्याचे मुळावर उठले चोर! डीपी फोडून तांब्याच्या तारा लंपास, पोलीस प्रशासन अपयशी?

Follow Us:
वाशिम जिल्ह्यातील पार्डीतिखे शेतशिवारात डीपी चोरीमुळे शेतकरी अडचणीत
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम | २५ जानेवारी २०२६

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पार्डीतिखे शेतशिवारात डीपी चोरीची गंभीर घटना समोर आली असून,
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरीला गेल्याने रब्बी हंगामात
शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. शेतकरी चोरी, डीपी चोरी, तांब्याच्या तारा चोरी
या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ही घटना दिनांक २१ जानेवारीच्या रात्री घडली असून, २२ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
पार्डीतिखे येथील सिद्धेश्वर संस्थानच्या शेतातील गट नंबर ४४ मधील डीपी चोरट्यांनी पोलवरून खाली पाडून
त्यातील मौल्यवान तांब्याच्या तारा लंपास केल्या.

सध्या रब्बी हंगाम सुरू असताना शेतातील बोअर व विहिरींमध्ये पाण्याची पातळी आधीच कमी झाली आहे.
त्यातच डीपी चोरी झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, शेतकऱ्यांच्या पिकांना तीव्र पाण्याचा ताण बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून, यापूर्वी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलखेडा व दापुरी खुर्द
शेतपरिसरात स्प्रिंकलरच्या तोट्यांच्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र या चोरींचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

पार्डीतिखे परिसर शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असून, सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे
पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
चोरट्यांचा तात्काळ शोध लावून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान, स्थानिक विद्युत तंत्रज्ञ देव्हडे यांनी घटनास्थळी पाहणी करून याबाबतचा सविस्तर अहवाल
रिठद येथील कनिष्ठ अभियंता जाधव यांच्याकडे सादर केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने नवीन डीपी बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


👉 Related News


👉 तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा – Kattanews.in

👉 अशीच महत्त्वाची ग्रामीण बातमी वाचण्यासाठी Kattanews.in फॉलो करा

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment