Advertisement
साखरखेर्डा |१२ जानेवारी २०२६
अतिवृष्टी, वाढते कर्ज आणि शेती पिकांचे मोठे नुकसान या आर्थिक विवंचनेतून शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची हृदयद्रावक घटना आज १२ जानेवारी रोजी उघडकीस आली. शिंदी शेतकरी आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिवृष्टी शेतकरी आत्महत्या ही समस्या पुन्हा एकदा समोर आली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी अधोरेखित झाल्या आहेत.
शिंदी गावातील मृत शेतकऱ्याचे नाव सुनील उत्तमराव खरात (वय ४५) असे आहे. त्यांनी स्वतःच्या घरातच गळफास लावून जीवन संपवले. सुनील खरात यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती असून ती आईच्या नावावर होती. शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज होते.आईच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुनील खरात यांच्यावर आली.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने उत्पन्न बंद झाले, मात्र कर्जाचे व्याज मात्र वाढतच गेले.दोन मुलांचा शिक्षणखर्च, घरखर्च आणि वाढते कर्ज यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. या मानसिक तणावातूनच त्यांनी १२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १:३० वाजताच्या सुमारास आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे बीट जमादार नितीन राजे जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात सुनील खरात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून या घटनेमुळे शिंदी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
📢 शेतकरी हितासाठी आवाज उठा
अशा गंभीर सामाजिक प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा.
👉 बातमी पाठवा | Katta News
📰 हे पण वाचा..