चिखली | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा गंभीर प्रकार
दिनांक ३० जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री घडल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सम्यक बुद्ध विहारासमोरील विद्युत मीटर उध्वस्त करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
अंधाराचा फायदा घेत काही तरुणांनी विहारातील महापुरुषांच्या प्रतिमांची
विटंबना करण्याच्या उद्देशाने हालचाल केल्याचे बौद्ध समाज बांधवांचे म्हणणे आहे.
यावेळी जागरूक नागरिकांनी त्यांना पाहून पकडण्याचा प्रयत्न केला असता
संशयित तरुण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
घटनेची माहिती देण्यासाठी बौद्ध समाज बांधव त्याच रात्री
पोलीस स्टेशन चिखली येथे दाखल झाले होते.
मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी २०२६ रोजी
दलित समाज बांधवांनी पोलीस ठाण्यावर घेराव घातला.
यानंतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून
उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलीस प्रशासनाने फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर
परिस्थिती शांत करण्यात आली.
दरम्यान, फरार आरोपींपैकी एक आरोपी हा
चिखली मतदारसंघातील सत्ताधारी आमदारांचा नातेवाईक असल्याचा
आरोप करण्यात येत असून,
या प्रकरणात राजकीय दबाव टाकून गुन्हा दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा
दावा दलित समाजाकडून करण्यात येत आहे.
“तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याने हा प्रकार
दलित समाजावर अन्याय करणारा आहे,”
अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मुख्य आरोपीस तात्काळ अटक करून
कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
अशी ठाम मागणी दलित समाज संघटनांकडून करण्यात येत आहे.
📌 दलित समाजाच्या प्रमुख मागण्या
- फरार आरोपींची तात्काळ अटक
- अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा
- राजकीय दबावमुक्त चौकशी
- सम्यक बुद्ध विहार परिसरात पोलीस बंदोबस्त
🔴 संबंधित बातम्या
- पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; आरोपी मलकापूर रेल्वे स्थानकावर अटकेत
- झोपेच्या डुलकीने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी
- भरधाव स्विफ्ट डिझायरच्या धडकेत एक महिला ठार, आठ महिला गंभीर जखमी
👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा – Kattanews.in














