चिखली /विशाल गवई
लातूर जिल्ह्यातील मौजे काटा (ता. औसा) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या निरागस अनुष्का पाटोळे (वय १२) हिचा ३ जानेवारी रोजी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू संपूर्ण समाजमनाला हादरवून टाकणारा आहे. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण हे हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कॅन्डल मार्चची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. यानंतर अनुष्काला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, हातात मेणबत्त्या घेऊन पोलीस लाईन – सिंधी कॉलनी चौक – अंजली टॉकीज मार्गे फुले–शाहू–आंबेडकर वाटिका, जयस्तंभ चौक येथे मार्चचा समारोप होणार आहे.
हे पण वाचा..
या शांततामय कॅन्डल मार्चद्वारे केवळ संवेदना व्यक्त करण्याचा उद्देश नसून, प्रशासनाचे लक्ष वेधून अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सकल मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
हे पण वाचा..
या कॅन्डल मार्चमध्ये सर्व नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी व न्यायप्रिय व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी होत शांतता, शिस्त व सौहार्द राखावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पण वाचा..
lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श











