वाशिम | प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील
वाशिम पंचायत समिती आंदोलन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
वाशिम पंचायत समिती आंदोलन अंतर्गत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने
पंचायत समिती कार्यालयासमोर 101 नारळ फोडून अनोखे आंदोलन केले.
विहीर, घरकुल, गोठा, फळबाग व नरेगा अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने
वाशिम पंचायत समिती आंदोलन अधिक तीव्र झाले असून
वाशिम पंचायत समिती आंदोलन शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत दर्शवत आहे.
लाभार्थ्यांनी अनेक वेळा पंचायत समिती कार्यालयाच्या चकरा मारल्या,
पायपीट केली, मात्र तरीही अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही.
यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पंचायत समिती कार्यालयात
खाजगी एजंटमार्फत पैशाची देवाण-घेवाण करूनच कामे केली जात आहेत.
ज्यांनी पैसे दिले त्यांनाच लाभ दिला जातो, तर प्रामाणिक लाभार्थ्यांना
डावलले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनावेळी करण्यात आला.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी
“अधिकाऱ्यांना तरी सद्बुद्धी यावी” या भावनेतून
101 नारळ फोडून हे अनोखे आंदोलन केले.
रखडलेले विहीर, घरकुल, गोठा, फळबाग व नरेगा अंतर्गतचे
सर्व अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे,
अशी ठाम मागणी करण्यात आली.
हे पण वाचा..
रिसोडमध्ये हॉटेल मजुराची गळफास घेऊन आत्महत्या; समर्थ नगर परिसरात खळबळ.
या आंदोलनावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे,
युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे,
संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
📢 जनहिताच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा
महाराष्ट्रातील ग्रामीण, शेतकरी आणि प्रशासनाशी संबंधित
विश्वासार्ह व प्रभावी बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी
आजच Kattanews.in ला भेट द्या.
🔗 संबंधित बातम्या










