विनायक कुटे/प्रतिनिधी
सुलतानपूर : भानापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या तणावामुळे अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही भानापूर शेतकरी आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.
अर्जुन आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकल्या मुलाच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
👉 वाचकांसाठी आवाहन
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाखाली असेल, तर तातडीने मदत घ्या. आत्महत्या हा उपाय नाही.
हे पण वाचा..
Follow Us
Kattanews.in – महाराष्ट्रातील नंबर १ विश्वासार्ह न्यूज वेबसाईट
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.












