नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून अभियंता ठाकरे यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा काम सुरू होण्याबाबत टाळाटाळ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र अखेर प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे आणि योग्य समन्वयामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत विशेष बाब म्हणजे पत्रकार गोपाल बोरकर यांच्या मागे कोणताही राजकीय वरदहस्त नव्हता. केवळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून, वस्तुनिष्ठ बातम्यांच्या जोरावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नांना अभियंता ठाकरे यांच्या माध्यमातून आणि कार्यकारी अभियंता सोनल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले.
चांडस ते नावली रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
📢 नागरिकांसाठी आवाहन
आपल्या परिसरातील प्रश्न, रस्ते, पाणी, वीज किंवा प्रशासनाशी संबंधित समस्या असल्यास KattaNews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवू.
🔗 संबंधित बातम्या
- जनगणना 2027 तयारीला वेग; रिसोड तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न.
- रिसोड येथे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला बचत गट कर्जवाटप मेळावा; महिलांच्या स्वावलंबनाला बळ.












