रिसोड| १७ जानेवारी २०२६
रिसोड येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयमध्ये आयोजित ‘भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये’ कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल बनसोड यांनी युवकांना संवैधानिक साक्षरता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेत उपस्थित राहून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची जोपासना हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
कार्यशाळेची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. IQAC प्रमुख डॉ. प्रमोदकुमार नंदेश्वर यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उत्तमचंदजी बगडियांनी सांगितले, “आजच्या जागतिकीकरणाच्या युगात युवकांना केवळ पदवीधर न राहता संवैधानिक साक्षर होणे गरजेचे आहे.”
हे पण वाचा..
मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक! आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. पी. खेडेकर, डॉ. जे. एस. मेश्राम, डॉ. के. के. बुधवंत आणि श्री. ओंकार पुरी यांच्यासह आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक पसायदानाने ही प्रेरणादायी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.












