बुलढाणा |२५ जानेवारी २०२६
मुंबई व महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जुने मित्र’ पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी आक्रमक शैलीत पूर्णविराम दिला आहे.
“आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हीच खरी व नैसर्गिक युती असल्याचे स्पष्ट केले.
ही युती केवळ सत्तेसाठी नसून ती हिंदुत्वाच्या विचारावर आधारित असल्याचे सांगत, “खरी बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच आहे,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.
उबाठा गटावर टीका करताना वाघ म्हणाले, “जे काही उबाठा गट आहे, तो आता बाजूला फेकला गेला आहे.” केवळ अफवा पसरवून राजकारण करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली असल्याचा दावा त्यांनी केला.
महायुतीने निवडणुकीच्या मैदानात आपली ताकद सिद्ध केली असून, आगामी काळात महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“जुने मित्र म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना! आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि महायुतीचाच महापौर बनवणार.”
— विनोद वाघ, प्रवक्ते, भाजप
हे पण वाचा.
पाटोदा येथे एसटी बसचा कहर; बाहेर निघालेल्या लोखंडी पत्र्यामुळे भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी
📢 अधिक राजकीय अपडेटसाठी KattaNews.in वाचत रहा
















