सिंदखेड राजा, दि. ३ मे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद नियुक्त सदस्यांच्या चर्चेत कायम चर्चेत असलेले अॅड. नाझेर काझी यांना यावेळीही संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. बुलढाणा येथे ३० एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे ठाण मांडत संताप व्यक्त केला असून, सामूहिक राजीनाम्यांची तयारी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे की, वारंवार चर्चेत येऊनही काझींना प्रत्यक्ष संधी का मिळत नाही? आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराजीकडे कसे पाहते आणि यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
👉 हे पण वाचा..
- लग्नाहून परतताना दुर्दैवी शेवट… मलकापूर पांग्रा वळणावर भीषण अपघातात दोघे ठार
- मध्यरात्री भीषण आग! लोणार तालुक्यातील वढव गावात 7 शेतकऱ्यांचे संसार राख; लोक रस्त्यावर
- ‘त्या’ एका धडकेत संपलं आयुष्य! टिटवी-लोणार रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक; २८ वर्षीय तरुण जागीच ठार
📢 हे आवश्यक करा
ताज्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत राहा. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.










