रिसोड | २१ जानेवारी २०१६
मोप तुरीची चोरी ही घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोप गावाच्या शेतशिवारात घडली असून,
दिव्यांग शेतकऱ्याच्या मेहनतीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मोप येथील अर्जुन मोतीराम नरवाडे (वय 61), व्यवसायाने दिव्यांग शेतकरी असून त्यांची
गट क्रमांक 115 मध्ये सुमारे 3.5 एकर शेती आहे.
या शेतात त्यांनी तुरीची पेरणी केली होती.
दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी तुरीची कापणी करून ती वाळण्यासाठी शेतातच ठेवण्यात आली होती.
दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तूर शेतात सुरक्षित होती.
मात्र 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शेतात गेल्यावर
कापून ठेवलेल्या तुरीपैकी काही रांगा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता कोणालाही याबाबत माहिती मिळाली नाही.
या चोरीत अंदाजे दीड क्विंटल तूर चोरीस गेली असून,
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार सुमारे 15 ते 16 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून,
प्राथमिक रिपोर्टमध्ये तुरीची किंमत अंदाजे 4,900 रुपये नमूद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान चोरीस गेलेला माल हस्तगत झाल्यास
त्याप्रमाणे अंतिम नुकसानाची रक्कम निश्चित केली जाईल.
सध्या पोलीस अधिक तपास करत असून, शेतमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
📌 कट्टा न्यूज आवाहन
शेतकऱ्यांच्या समस्या, अन्याय व गुन्हेगारी घटनांबाबत आवाज उठवण्यासाठी
Kattanews.in सतत कटिबद्ध आहे.
अशा घटना घडत असल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवावे.
🔗 Related News










