Advertisement
लोणार/विनायक कुटे :
सध्या रेतीसाठी जीव गहाण अशी परिस्थिती लोणार–मंठा महामार्गावर पाहायला मिळत आहे. विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा लोणार–मंठा महामार्ग आज अपघात, भीती आणि मृत्यूचे प्रतीक बनत चालला आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे लोणार–मंठा महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत असून अनेकांना हा लोणार–मंठा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा वाटू लागला आहे.
या मार्गावर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर सर्रास धावत असून अनेक टिप्परांना नंबर प्लेटच नसल्याचे चित्र आहे. त्यातच काही चालक नशेत असल्यामुळे हे अवजड टिप्पर बेधडकपणे चालवले जात आहेत. परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, प्रवासी आणि पादचारी यांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी टिप्पर मालकांचे एजंट फोर-व्हीलर गाड्यांमधून रस्त्यावर गस्त घालत फिरत असल्याचे दिसते. या टोळ्यांना काही आका-बोक्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून त्यामुळेच कारवाई होत नाही का, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.कायदे कागदांपुरते मर्यादित राहिले आहेत, जबाबदाऱ्या फाईलमध्ये अडकल्या आहेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर सामान्य माणसाचा जीव रेतीपेक्षाही स्वस्त ठरत असल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे. आजची डोळेझाक उद्याच्या मोठ्या शोकांतिकेचे कारण ठरू शकते, अशी भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.या संदर्भात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी मापारी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आजचा निष्काळजीपणा उद्याचा शोक ठरू नये. रेती पुन्हा मिळू शकते, पण गेलेला जीव कधीच परत येत नाही.
हे पण वाचा..
‘ऑन ड्यूटी’ पोलिसावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला! कर्तव्यावर जातानाच बेदम मारहाण; बुलढाणा बसस्थानक हादरले.
👉 लोणार–मंठा महामार्गावरील अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अशा महत्त्वाच्या आणि धक्कादायक स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या आणि ही बातमी शेअर करून जनजागृती करा.