वाशिम/नारायणराव आरु पाटील
पिक विमा आंदोलन वाशिम या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून वाशिम जिल्ह्यात २०२४-२५ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सोयाबीनसह इतर पिके वाहून गेली असून नुकसान भरून न निघणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकार व पिक विमा कंपनी यांच्यातील साटेलोट्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत विमा कंपनीच्या सांगण्यावरून उंबरठा अट लागू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा न झाल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने रिसोड-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर पाचमल आडोळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सरकारने तात्काळ मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे पण वाचा..
या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण पाटील मते, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे, गजानन पैठणकर, पांडुरंग कढणे, संदीप खोलगडे, गजानन घाटूळकर, पांडुरंग देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
हे पण वाचा..
भर जहागीर गावात घाणीचे साम्राज्य! निवेदन देऊनही प्रशासन गप्प; नागरिक संतप्त.










