जालना प्रतिनिधी/संजीव पाटील
जालना शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येणार असल्याचे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जालना शहरात आयोजित महानगरपालिका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
जालना शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जात असून हा प्रश्न कायमचा मिटवण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना शहराचा सर्वांगीण विकास हाच भाजपाचा मुख्य अजेंडा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालना शहरातील पाणी प्रश्नासोबतच कचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार असून स्वच्छ आणि सुंदर जालना घडवण्याचा सरकारचा मानस आहे.
जालना शहरासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच समृद्धी महामार्गाशी जोडलेला ड्राय पोर्ट, रेल्वे स्थानकासाठी निधी आणि अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जालना शहराची ओळख ‘स्टील नगरी’ म्हणून असून येथे मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक येत आहे.
यामुळे भविष्यात रोजगार निर्मिती होऊन बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
शहरातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन पक्की घरकुले उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी जाहीर केले.
विरोधकांकडून लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप करत,
लाडकी बहिण योजना बंद होणार नाही तर अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल,
आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भास्कर आबा दानवे, सिद्धीविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
👉 Call To Action
जालना शहराच्या विकासासाठी तुमचे मत महत्त्वाचे आहे.
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या.
🔗 Related News













