विशाल गवई/प्रतिनिधी
निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अजीम नवाज राही हे महाराष्ट्रातील लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रातील प्रभावी आणि वलयांकित नाव आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि वळीवाच्या वेळा हे त्यांचे गाजलेले व दर्जेदार कवितासंग्रह मराठी साहित्यविश्वात विशेष मानाचे मानले जातात.
निवेदक व वक्ता म्हणून त्यांच्या प्रभावी, रसाळ आणि ओघवत्या वाणीने त्यांनी राज्यभरातील साहित्यरसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना आजवर महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, केशवसुत पुरस्कार, शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमात कवितांचा समावेश
अजीम नवाज राही यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ या कवितासंग्रहांचा इयत्ता १० वी, ११ वी तसेच महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांमध्ये BA, MA, BCom, BSc अभ्यासक्रमात समावेश आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.
लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बुलढाणा शहर साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि रसिकांसाठी विचारमंथनाचे केंद्र ठरणार आहे.
📌 हे पण वाचा..
- देऊळगाव राजाची प्रतिष्ठेची लढाई! माजी-विद्यमान आमदारांची थेट कसोटी, २९ हजार मतदार ठरवणार निकाल.
- सिंदखेडराजा नगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय, देऊळगाव राजा नगरपालिकेत अजित पवार गटाची सरशी.
- मेहकर-लोणारमध्ये उबाठा व काँग्रेसचा डंका; किशोर गारोळे व मीरा मापारी विजयी
👉 वाचत राहा : KattaNews.in | बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी.












