
रिसोड शहरातील महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांची मालिका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत आहे. नगर पालिका रिसोड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना अनेकवेळा तक्रारी देण्यात आल्या असल्या तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
अतिक्रमणामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नाही. दुचाकी, चारचाकी आणि पादचारी यांच्यात धडक होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. स्थानिक नागरिक म्हणतात, “वाशिम रोडवरील या ठिकाणी कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकते.”
याच मार्गावर महाविद्यालय असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः मुली, या रस्त्याने ये-जा करतात. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाढलेली वाहतूक त्यांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोक्याचे कारण ठरत आहे.
हे पण वाचा..
वाशीम: Strong Room EVM सुरक्षा व मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी निवेदन.
महावितरण कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक वीजबिल भरण्यासाठी येतात. वाढती गर्दी आणि अराजकतेमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी संघटनांकडून अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी, अशी मागणी केली जात आहे.












