लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे
मात्र अज्ञात चोरट्यांनी स्प्रिंकलर संचातील एक हजार तोटे रातोरात लंपास केल्याने शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. “कर्ज काढून स्प्रिंकलर लावले, पण तोट्या चोरीला गेल्याने पाणी देणेच बंद पडले,” अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जवळच्या गावातही अशाच प्रकारे स्प्रिंकलर साहित्य चोरीला गेल्याची नोंद आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रात्री गस्त वाढवण्याची आणि शिवारात टेहळणी पथक तैनात करण्याची मागणी होत आहे.
हे पण वाचा..
जिल्ह्यात तिळाचे 100% मोफत बियाणे वितरण सुरू; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची मोठी संधी.
रब्बी हंगामात सुरुवातीचे पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशातच स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याने पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या चोरीच्या घटना—या दुहेरी संकटामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.
👉 हे आवश्यक करा.
✔ आपल्या भागातील चोरीच्या घटनांची माहिती आम्हाला पाठवा
✔ Agriculture चोरी संबंधित व्हिडिओ/फोटो WhatsApp वर पाठवा
✔ ग्रामीण सुरक्षेबाबत जागरूकता वाढवूया – kattanews.in ला फॉलो करा
🔍 हे पण वाचा..













