हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती, मदत शून्य; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही विधवा पत्नीची तहसील कार्यालयात फरफट

Follow Us:
अतिवृष्टी नुकसान भरपाई न मिळाल्याने अडचणीत आलेले शेतकरी कुटुंब
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड तालुका | २६ फेब्रुवारी २०२६

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि वाढते शेतकरी संकट ही केवळ आकडेवारी नसून हजारो कुटुंबांच्या वेदनांची कहाणी आहे. रिसोड तालुक्यातील भोकरखेड येथे अल्पभूधारक शेतकरी नामदेव शंकर रंजवे यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडता न आल्याने आत्महत्या केली. मात्र दोन वर्षांनंतरही त्यांच्या कुटुंबाला शासनाची नुकसान भरपाई मिळालेली नाही.

भोकरखेड येथील या घटनेने ग्रामीण भागातील शेतकरी संकटाची भीषणता पुन्हा समोर आणली आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि महसूल यंत्रणेची उदासीनता यामुळे रंजवे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.नामदेव रंजवे हे अत्यल्प भूधारक शेतकरी होते. सलग नापिकी आणि अतिवृष्टीमुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. बँकेचे कर्ज आणि खासगी सावकारांचा दबाव वाढत गेल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले आणि 23 जानेवारी 2025 रोजी गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली.घटनेनंतर कुटुंबाला शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई, विमा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आजपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.

विधवा शशीकला नामदेव रंजवे यांनी मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही महसूल विभागाकडून वारंवार नवीन कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून त्या तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.

श्रावणबाळ योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा आणि अन्य शासकीय मदतीसाठी अर्ज करूनही लाभ नाकारण्यात आल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

गत सोमवारी त्यांनी तहसील कार्यालयात आपली व्यथा मांडताना हृदयद्रावक प्रश्न उपस्थित केला — “माझ्या पतीने मरण पत्करले, आता आम्हालाही जगण्याचा अधिकार नाही का?”

या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत असतानाही मदत न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाची फरफट सुरू राहत असेल तर ही यंत्रणा नेमकी कुणासाठी आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

महसूल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या विधवा महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि प्रलंबित मदत मंजूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


📌 संबंधित बातम्या


📢 तुमचे मत महत्त्वाचे

शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काय करावे? तुमचे मत आम्हाला जरूर कळवा.

👉 अधिक स्थानिक बातम्यांसाठी भेट द्या: Kattanews.in

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आगरवाडी येथे अंधश्रद्धा जनजागृती कार्यक्रमात नागरिकांची उपस्थिती

भोंदूगिरीचा बाजार उठवा! आगरवाडीत अंधश्रद्धेविरुद्ध विठाई प्रतिष्ठानचा एल्गार

Risod Sakhara road potholes protest villagers on water tank Washim Maharashtra

रिसोड-साखरा रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांचा इशारा

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रिसोड पोलिसांनी हरवलेल्या मुलांची सुटका

ऑपरेशन मुस्कान : रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ अपहरण प्रकरणांचा छडा, हरवलेले चेहरे पुन्हा हसले

Risod police rescuing missing persons during Operation Muskan in Washim district

रिसोड पोलिसांचा मोठा पराक्रम! १५ दिवसांत ४ अपहरण गुन्हे उघड, १० जणांची सुखरूप सुटका

चिखला काकड घटनेच्या निषेधार्थ साखरखेर्डा बंद दरम्यान बंद असलेली बाजारपेठ

चिखला काकड प्रकरणाच्या निषेधार्थ साखरखेर्डा कडकडीत बंद; महिलांवरील अमानुष अत्याचाराने संताप

कुकसा ग्रामपंचायतीतील रस्ते कामावर गैरव्यवहाराचा आरोप

कुकसा ग्रामपंचायतीत ₹16 लाखांच्या रस्ते कामात गैरव्यवहार? टेंडरशिवाय काम सुरू, घरकुल योजनेत पैशांची वसुलीचे आरोप

Leave a Comment