वाशीम |२२ जानेवारी २०२६
आडोळी ते अटकळी या पांदण रस्त्यावर पूल नसल्यामुळे शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत.
वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांची भेट घेऊन
स्थानिक विकास निधीतून या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पूल उभारण्याची गरज मांडली.
या रस्त्यामधील नाल्यावर वर्षभर पाणी वाहत असल्याने पेरणी, मशागत, पीक काढणी
आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे बंद पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
हे पण वाचा..
रातोरात शेतकऱ्यांचा कणा मोडला! येवती-रिठद शेतशिवारात ३०० पेक्षा जास्त स्प्रिंकलर तोट्यांची मोठी चोरी
जर आडोळी ते अटकळी पांदण रस्त्यावर पूल उभारण्यात आला,
तर शेती कामे सुलभ होतील, वाहतूक सुरक्षित बनेल
आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आमदार श्याम खोडे यांनी आपल्या स्थानिक निधीतून तातडीने पूल मंजूर करावा,
अशी ठाम मागणी आडोळी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
📢 तुमच्या भागातील समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा
ग्रामीण भागातील समस्या, अन्याय किंवा विकासाच्या मागण्या असतील
तर त्या Kattanews.in कडे पाठवा.
आपली बातमी – आपला आवाज!
🔗 Related News











