विजय जुंजारे/रिसोड :
अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये महावितरण स्मार्ट मीटर बसवणीवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. नागरिकांची कोणतीही लेखी अथवा तोंडी संमती न घेता महावितरण स्मार्ट मीटर (smart meter) थेट घराघरांत बसवले जात असल्याचे आरोप होत आहेत. महावितरण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले अचानक वाढल्याची उदाहरणे समोर येत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या महावितरण स्मार्ट मीटर ही बाब जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज बिल दुप्पट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचा थेट फटका गरीब, शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी वाढलेली वीज बिले मोठे आर्थिक संकट ठरत आहेत.
याचबरोबर स्मार्ट मीटरमुळे घरगुती दळणाचे दर प्रति किलो पाच रुपये झाले असून, हा अप्रत्यक्ष खर्च सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणारा ठरत आहे. अकोला, वाशिम व बुलढाणा हे जिल्हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने येथे अशा योजना लादण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्राहक व सामाजिक संघटनांनी या प्रकरणी सरकारकडे थेट सवाल उपस्थित केले आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याचा अधिकार कुणी दिला, वाढलेल्या बिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, आणि मागास जिल्ह्यांनाच लक्ष्य का केले जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन स्मार्ट मीटर बसवणी थांबवावी व नागरिकांच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
असा अनुभव असल्यास Kattanews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू.
- शिक्षकांना शिकवणं सोडून कुत्र्यांची पाळत ठेवण्याचा शिक्षण विभागाचा अजब आणि धक्कादायक निर्णय.
- काळी पिवळी उलटून १३ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर
- करडी पुलावर मृत्यूचा तांडव! एसटी बसखाली ट्रिपल सीट दुचाकी चिरडली; तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू.













