हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महावितरणचा धक्कादायक प्रकार! नागरिकांची परवानगी न घेता घरोघरी जबरदस्ती स्मार्ट मीटर – आदेश कुणाचा?

On: January 7, 2026 2:19 PM
Follow Us:
महावितरणकडून घराघरात स्मार्ट मीटर बसवताना कर्मचारी, नागरिकांचा विरोध
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विजय जुंजारे/रिसोड :

अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये महावितरण स्मार्ट मीटर बसवणीवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. नागरिकांची कोणतीही लेखी अथवा तोंडी संमती न घेता महावितरण स्मार्ट मीटर (smart meter) थेट घराघरांत बसवले जात असल्याचे आरोप होत आहेत. महावितरण स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले अचानक वाढल्याची उदाहरणे समोर येत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या महावितरण स्मार्ट मीटर ही बाब जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

महावितरणचे कर्मचारी “वरून आदेश आहेत” असे सांगत मीटर बदलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या आदेशांची कोणतीही लेखी माहिती किंवा अधिकृत सूचना नागरिकांना दिली जात नाही. विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम Genus Power Infrastructure Ltd. या कंपनीमार्फत सुरू आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज बिल दुप्पट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचा थेट फटका गरीब, शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी वाढलेली वीज बिले मोठे आर्थिक संकट ठरत आहेत.

याचबरोबर स्मार्ट मीटरमुळे घरगुती दळणाचे दर प्रति किलो पाच रुपये झाले असून, हा अप्रत्यक्ष खर्च सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणारा ठरत आहे. अकोला, वाशिम व बुलढाणा हे जिल्हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने येथे अशा योजना लादण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्राहक व सामाजिक संघटनांनी या प्रकरणी सरकारकडे थेट सवाल उपस्थित केले आहेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याचा अधिकार कुणी दिला, वाढलेल्या बिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, आणि मागास जिल्ह्यांनाच लक्ष्य का केले जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन स्मार्ट मीटर बसवणी थांबवावी व नागरिकांच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

📢 तुमच्या भागातही स्मार्ट मीटरमुळे बिल वाढले आहे का?
असा अनुभव असल्यास Kattanews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू.

🔗 संबंधित बातम्या :

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली तालुक्यातील किन्होळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

किन्होळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; दलित समाज संतप्त

मुंबईतील बुलढाणा जिल्हा बौद्ध समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

मुंबईत बुलढाणा भवन उभारणीचा ऐतिहासिक संकल्प; पुढील वर्षी भूमिपूजन – आ. सिद्धार्थ खरात

महाराष्ट्रातील शिक्षक व प्राध्यापक थकीत देयके प्रलंबित

शासनाला थकीत देयके निकाली काढायचे नाहीत का? शिक्षक-प्राध्यापकांचे पाच ते सहा वर्षांपासूनचे पैसे रखडले

केनवड येथे आमदार अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन

देर आये दुरुस्त आये! केनवड येथे आ. अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत

सोमनाथ वस्ती चिखली येथे आयोजित विशाल हिंदू संमेलन

RSS शताब्दी वर्षानिमित्त सोमनाथ वस्तीमध्ये विशाल हिंदू संमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद

अजित पवार निधनानंतर भावुक प्रतिक्रिया देताना अॅड. नाझेर काझी

जन्मदात्या पित्यापाठोपाठ राजकीय बापाचं छत्र हरवलं; अजित दादांच्या निधनाने मी कायमचा पोरका झालो – अॅड. नाझेर काझी

Leave a Comment