चिखली |२६ जानेवारी २०२६
Chikhali Suicide Case — लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले आणि ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने केळवद (ता. चिखली) येथे २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली तालुक्यातील केळवद येथे राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील २० वर्षीय तरुणीचे तनमय विजय गवई (रा. पाटोदा, ता. चिखली) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने पीडितेला “उन्हाळ्यात आपण लग्न करू” असे आश्वासन दिले होते. या विश्वासावर दोघेही सातत्याने संपर्कात होते.
दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १०.५३ वाजताच्या सुमारास आरोपीने तरुणीला फोन केला. या संभाषणात त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने तरुणीने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
हे पण वाचा.
घटनेनंतर तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी तनमय विजय गवई याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत
🔔 Related News
👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा
Kattanews.in वर तुमच्या गावातील, शहरातील किंवा जिल्ह्यातील ताज्या, सत्य व विश्वासार्ह बातम्या प्रसिद्ध करा.
आताच संपर्क करा










