हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अतिवृष्टी, कर्जाचा फास अन् संपलेली आशा; भानापूरच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

On: December 29, 2025 8:27 AM
Follow Us:
भानापूर शेतकरी आत्महत्या अतिवृष्टी कर्जबाजारीपणा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विनायक कुटे/प्रतिनिधी 

सुलतानपूर : भानापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या तणावामुळे अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही भानापूर शेतकरी आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

अर्जुन आव्हाळे यांच्याकडे सुमारे ५८ गुंठे शेती होती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे बँक कर्जासह खासगी उसनवारीची परतफेड अशक्य बनली होती. याच कारणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते.दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात त्यांनी विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अर्जुन आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमुकल्या मुलाच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.


👉 वाचकांसाठी आवाहन

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाखाली असेल, तर तातडीने मदत घ्या. आत्महत्या हा उपाय नाही.


हे पण वाचा..


Follow Us

Kattanews.in – महाराष्ट्रातील नंबर १ विश्वासार्ह न्यूज वेबसाईट
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment