हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अमरावतीत पुन्हा अतिक्रमण! सोनल काॅलनीतील रहिवाशांचा मनपाकडे संतापाचा पवित्रा

On: October 28, 2025 12:01 PM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सुधीर ढगे/प्रतिनिधी

अमरावती : शहरातील सोनल काॅलनी परिसर पुन्हा एकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथे मोठी कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते. पण काही दिवसातच पुन्हा हेच अतिक्रमण उभे राहिल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, “मनपाची कारवाई केवळ औपचारिक ठरली आहे. काहीच दिवसांत अतिक्रमण धारकांनी पुन्हा रस्त्यावर झोपड्या, शेड्स आणि दुकानांची रचना केली आहे.” त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालीत अडथळा निर्माण झाला असून, रस्ते पुन्हा संकुचित झाले आहेत.

शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी झालेल्या कारवाईत झोन क्र. १ चे कालमिक साहेब आणि अतिक्रमण विभागाचे कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सात अतिक्रमण धारकांवर कठोर कारवाई करण्यात आली होती. पण आता पुन्हा तेच अतिक्रमण सुरू झाल्याने कारवाईचा परिणाम शून्य ठरला आहे.

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. “ज्यांनी पुन्हा अतिक्रमण केलं आहे, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजेत,” असा ठाम सूर रहिवाशांनी लावला आहे.

याशिवाय, संबंधित रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या झाडांमुळे वाहनांची व पादचाऱ्यांची हालचाल अडथळित होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्यान विभागाने त्या झाडांची पाहणी करून आवश्यक झाडांची तोड करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सध्या सोनल कॉलनी परिसरातील रस्ते पुन्हा अतिक्रमणग्रस्त झाले असून, नागरिकांच्या सुरक्षित हालचालीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरातील लग्न सोहळ्यात भीतीचे वातावरण

लग्नाच्या मंडपात अचानक मधमाश्यांचा हल्ला; आनंदाच्या वातावरणात उडाली भीतीची धावपळ, 7 जखमी

मेहकर येथे पोलिस नाईकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना

मेहकरमध्ये धक्कादायक घटना! बुलढाणा मुख्यालयातील पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप गूढ

Vrushali Gavande teacher murder case buldhana

धक्कादायक! शिक्षिका पत्नीचा अपघात नसून सुपारी देऊन खून; पतीसह दोघे अटकेत

सुलतानपूर येथे बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला… सुलतानपूरमध्ये 24 वर्षीय बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

साखरखेर्डा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे उद्घाटन करताना तहसीलदार अजित दिवटे

60 किमी प्रवासाला पूर्णविराम! साखरखेर्ड्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ सुरू

कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा येथे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 निमित्त सत्कार

साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025

Leave a Comment