रिसोड | २२ जानेवारी २०२६
येवती-रिठद शेतशिवारातील स्प्रिंकलर चोरी प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दि. २० जानेवारी २०२६ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ३०० पेक्षा जास्त स्प्रिंकलरच्या तोट्या लंपास केल्याची घटना समोर आली असून सकाळी ही बाब उघडकीस आली.
या घटनेमुळे येवती व रिठद येथील २५ हून अधिक शेतकरी थेट आर्थिक संकटात सापडले आहेत. याआधीही दापोरी, बेलखेडा, हिवरा पेन आदी परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
प्रत्येक स्प्रिंकलर तोटीची किंमत ७०० ते ८०० रुपये असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही चोरी म्हणजे दुहेरी मार ठरला आहे.
हे प्रकरण वाशिम पोलीस स्टेशन हद्दीत येत असताना, वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कोणतीही टीम घटनास्थळी पोहोचलेली नव्हती. मात्र, या घटनेची माहिती स्थानिक आमदार अमित सुभाषराव झनक यांना देण्यात आली आहे.
हे पण वाचा..
आमदार झनक यांनी पोलिस ठाणेदारांना तात्काळ सूचना दिल्याचे सांगण्यात आले असून लवकरच घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
🔍 चोरीने बाधित शेतकरी
येवती: मधुकर माळेकर, शुभम माळेकर, भगवान माळेकर, मोहन माळेकर, ज्ञानबा माळेकर, नारायण माळेकर, सुनील माळेकर.
रिठद: रामेश्वर आरु, विश्वनाथ आरु, विजय बोरकर, चंद्रकांत बोरकर, सदाशिव आरु, काशिनाथ आरु, पांडुरंग पाटील, प्रल्हाद आरु यांच्यासह अनेक शेतकरी.
📢 शेतकऱ्यांची मागणी
तात्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
👉 KattaNews Impact
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हेच कट्टा न्यूजचे ध्येय आहे.
🔗 Related News











