वाशिम/नारायणराव आरु पाटील

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर आमदार अमित झनक यांनी विधानसभेत ठाम आणि प्रभावी आवाज उठवला. पैनगंगा–नळगंगा नदी जोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश झाला असल्यास आतापर्यंत कोणती कामे झाली आहेत, असा थेट प्रश्न त्यांनी मंत्र्यांना विचारला. मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच, वाशिमचे हक्काचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व कोराडी धरणातून उपलब्ध करावयाचे असल्याचे ठामपणे सांगितले.
आमदार झनक यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी तत्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी केली, ज्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.










