वाशिम जिल्हा प्रतिनिधी |१० मार्च २०२६
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते लखनसिंह ठाकुर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन केली आहे. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रिसोड शहरालगत असलेले मौजे निजामपूर हे गाव निजाम काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी गावाचे नाव अजूनही ‘निजामपूर’ असेच असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत निजामपूरनेही एकमताने ग्रामसभेत ठराव मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील नागरिक, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनतेनेही या नावबदलाला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी प्रधान सचिव (महसूल), विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी वाशिम यांनाही देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासन स्तरावर या मागणीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📢 Kattanews.in वाचकांसाठी
तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
🔎 Related News
- रिसोड नगर परिषदेत ‘कर भरा-पावती घ्या’ घोटाळा? प्रशासन मौन
- मेहकरमध्ये धक्कादायक घटना! बुलढाणा मुख्यालयातील पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप गूढ
- शिक्षक पत्नीचा सुपारी देऊन खून; धक्कादायक खुलासा










