हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

निजामपूरचे नाव बदलणार? ‘श्रीरामपूर’ करण्याची भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांची मोठी मागणी

Follow Us:
भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्याची मागणी केली

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी |१० मार्च २०२६ 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते लखनसिंह ठाकुर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन केली आहे. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

रिसोड शहरालगत असलेले मौजे निजामपूर हे गाव निजाम काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी गावाचे नाव अजूनही ‘निजामपूर’ असेच असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत निजामपूरनेही एकमताने ग्रामसभेत ठराव मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील नागरिक, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनतेनेही या नावबदलाला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी प्रधान सचिव (महसूल), विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी वाशिम यांनाही देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासन स्तरावर या मागणीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


📢 Kattanews.in वाचकांसाठी

तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.


🔎 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांनी निक्षय मित्र म्हणून टीबी रुग्ण दत्तक घेतल्यावेळी

टीबीमुक्त बुलढाणासाठी सीईओ गुलाब खरात यांचा मोठा पुढाकार; सहा महिन्यांसाठी टीबी रुग्ण दत्तक

साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित भाविक

साखरखेर्ड्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात; श्री प्रल्हाद महाराज संस्थान व श्री पलसिद्ध महास्वामी मठात हजारो भाविकांची उपस्थिती

Leave a Comment