वाशिम | ४ फेब्रुवारी २०२६
गजानन सोपान भिसडे यांची गट नंबर १२१, क्षेत्र ३ एकर १५ गुंठे जमीन असून या शेतात तुरीची सोंगणी करून गंजी लावून ठेवण्यात आली होती.
दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता अज्ञात व्यक्तीने या तुरीच्या गंजीला आग लावली. या आगीत जवळपास २५ पोते तूर जळून खाक झाली असून सुमारे २ ते २.२५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे हिरावून घेतला गेला असून शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेची माहिती भिसडे यांनी फोनद्वारे दिली आहे. सदर प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मात्र, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या महसुली परिसरात यापूर्वीही चोरी व आगजनीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, रिसोड पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
👉 आपल्या परिसरातील बातम्या Kattanews.in वर पाठवा
📞 संपर्क : 8975013665 | 📧 Email : kattanews@gmail.com
संबंधित बातम्या
- अडोळी परिसरात रानडुकरांचा हैदोस! गहू पिक फस्त; शेतकरी उध्वस्त
- देर आये दुरुस्त आये! केनवड येथे आ. अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत
- तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण गरजेचे











