साखरखेर्डा | २८ जानेवारी २०२६
ग्रामीण खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात राज्य व देश पातळीवर संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे क्रिडांगण. साखरखेर्डा येथे अद्ययावत क्रिडांगण उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित पाठपुरावा करावा. मी निश्चितपणे येथे क्रिडांगण उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
खेळ हा सर्व समाजाला एकत्र आणणारा घटक आहे. राजकारणही अशाच एकोप्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने झाले पाहिजे. केवळ ‘माझा समाज’ या विचारावर राजकारण चालत नाही, असे मत बजरंग दलाचे अमोल अंधारे यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. संजय रायमुलकर व विलास गवई यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण देशमुख यांनी केले, तर संचालन ओम सोनुने यांनी केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
ही खासदार चषक क्रिकेट स्पर्धा योगेश जाधव व मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून, प्रथम बक्षीस १ लाख रुपये, द्वितीय ५१ हजार, तृतीय ३१ हजार व चतुर्थ २१ हजार रुपये अशी एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
📌 संबंधित बातम्या












