नागपूर |कट्टा न्यूज नेटवर्क
नागपूरात सध्या एक मोठा वाद पेटला असून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आमनेसामने आले आहेत. “खाज असेल तर नागपुरात या!” असं थेट आणि आक्रमक आव्हान देत धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानवांना उघड चॅलेंज दिलं आहे. ₹80 लाखांच्या बक्षिसाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथे सुरू असलेल्या रामकथेच्या कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते नागपूरात पाच दिवस उपस्थित राहणार असून कोणालाही शंका असल्यास त्यांनी थेट येऊन प्रश्न विचारावेत. “आम्ही जादूगार नाही, पण ईश्वराच्या प्रेरणेने लोकांना मार्गदर्शन करतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित लोकांमध्ये उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनीही या आव्हानाला उत्तर देत धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली आहे. “जर त्यांनी चमत्कार सिद्ध केला आणि 90 टक्के अचूकता दाखवली, तर आम्ही आमची संस्था बंद करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे वाद अधिकच तीव्र झाला आहे.
दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामुळे नागपूरातील वातावरण चांगलंच तापलं असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रेशीमबाग येथील रामकथेच्या पार्श्वभूमीवर या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
👉 Related News
- “रोपवाटीकांना आग लागते की लावली जाते?” सिंदखेडराजात दुसऱ्यांदा ५५५५ रोपे जळाली; मोठा घोटाळा?
- ‘7 तारखेला येतो… समोर ये!’ रोहित पवार vs संजय गायकवाड; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून महाराष्ट्रात मोठा वाद
- बुलढाणा तणावग्रस्त! आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन उफाळलं; पोलिसांशी झटापट, अनेक जण ताब्यात
📢 हे आवश्यक करा..
अशा ताज्या आणि व्हायरल बातम्यांसाठी आमच्या Kattanews.in ला भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.










