संजीव पाटील/भोकरदन
भोकरदन तहसील आंदोलन हे 13 शेतकऱ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या निषेधार्थ करण्यात आले.
भोकरदन तहसील आंदोलन मुळे महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भोकरदन तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला.
“शेतकऱ्यांना वाली कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर उतरले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि आमदार संतोष दानवे यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप केले.
शांततेत आंदोलन करूनही 13 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप आहे.
“गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे पण वाचा..
या संपूर्ण प्रकरणाचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट दैनिक बुलंद शक्तीचे मुख्य संपादक
रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी ‘बोल बिंदास बोल’ या विशेष कार्यक्रमातून मांडला आहे.
“शेतकऱ्यांनो जागे व्हा, अन्यायाविरोधात एकत्र या,” असे आवाहन करत हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📢 महत्त्वाचे आवाहन
अशाच विश्वासार्ह, निर्भीड आणि थेट ग्राऊंड रिपोर्टसाठी
महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट KattaNews.in ला आजच Follow करा.
🔗 Related News













