चिखली बुलढाणा| कट्टा न्यूज नेटवर्क
आज करवंड गावात अक्षरशः इतिहास जिवंत झाला. 370 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाह सोहळ्याची भव्य पुनर्रचना करण्यात आली. या सोहळ्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून, किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
या महोत्सवात विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, मनोज यदे, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार श्वेता महाले यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा भव्य सोहळा साकार झाला. तसेच चिखली ते बुलढाणा दरम्यान वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
या महोत्सवामुळे केवळ इतिहासाला उजाळा मिळाला नाही, तर करवंड परिसराच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
👉 तुमच्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी Kattanews.in ला फॉलो करा
Kattanews.in वर रोज अपडेट राहा
Related News










