हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

निजामपूरचे नाव बदलणार? ‘श्रीरामपूर’ करण्याची भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांची मोठी मागणी

Follow Us:
भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्याची मागणी केली
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी |१० मार्च २०२६ 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते लखनसिंह ठाकुर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन केली आहे. या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रिसोड शहरालगत असलेले मौजे निजामपूर हे गाव निजाम काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी गावाचे नाव अजूनही ‘निजामपूर’ असेच असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत निजामपूरनेही एकमताने ग्रामसभेत ठराव मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील नागरिक, तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनतेनेही या नावबदलाला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेते लखनसिंह ठाकुर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन निजामपूर गावाचे नाव बदलून ‘श्रीरामपूर’ करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी प्रधान सचिव (महसूल), विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी वाशिम यांनाही देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आता शासन स्तरावर या मागणीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


📢 Kattanews.in वाचकांसाठी

तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.


🔎 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

साखरखेर्ड्यात महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; “स्त्री शक्तीचा सन्मान हीच खरी ओळख” – वर्षाताई उगलमुगले

खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा मण्यार सापाच्या दंशाने मृत्यू

“सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू!” खामगावमध्ये मण्यारच्या दंशाने 33 वर्षीय युवकाचा अंत

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

रिसोड नगर परिषदेत कर भरल्यानंतर पावत्या कॅन्सल केल्याची चर्चा

रिसोड नगर परिषदेत ‘कर भरा-पावती घ्या आणि नंतर कॅन्सल’ घोटाळा? दीड वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा, प्रशासन मौन

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरातील लग्न सोहळ्यात भीतीचे वातावरण

लग्नाच्या मंडपात अचानक मधमाश्यांचा हल्ला; आनंदाच्या वातावरणात उडाली भीतीची धावपळ, 7 जखमी

मेहकर येथे पोलिस नाईकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना

मेहकरमध्ये धक्कादायक घटना! बुलढाणा मुख्यालयातील पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप गूढ

Leave a Comment