वाशिम |३१ जानेवारी २०२६
हे दोन शब्द उच्चारताच संपूर्ण केनवड गाव शोकसागरात बुडाले. निर्भीड, परखड आणि स्पष्ट वक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक लाडका नेता गमावला आहे.
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रिसोड तालुक्यातील केनवड गावात घडलेली ती मध्यरात्रीची भेट आजही कार्यकर्त्यांच्या मनात कोरली गेली आहे. रात्री साधारण दोन वाजताच्या सुमारास दादांचे ते शब्द आजही कानात घुमतात.
“अरे अंकुश, मी तुला बजावून सांगितलं होतं की आराम करा… आता किती वाजले?”
या आपुलकीच्या शब्दांतून दादांचा माणुसकीचा स्वभाव प्रत्ययास आला होता.
त्यावेळी गजानन गोळे या सच्च्या कार्यकर्त्याशी रात्री एक वाजता केनवड येथे झालेली भेट अत्यंत भावनिक ठरली.
“आता नीट घरी जा रे बाबा… घरी लेकरं-बाळ वाट पाहत असतील!”
दादांनी प्रेमाने उच्चारलेले हे शब्द आज आठवणींमध्ये जिवंत झाले आहेत.
कार्यकर्त्यांवर असलेले दादांचे प्रेम, माया आणि काळजी प्रत्येक भेटीतून जाणवत होती. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने केनवड गावासह संपूर्ण परिसर हळहळला आहे.
लाडक्या नेत्याच्या आठवणी जागवत केनवड गावातील चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “दादा, आपण कायम आमच्या स्मरणात राहाल” अशा भावना प्रत्येकाच्या डोळ्यांतून व्यक्त होत होत्या.
👉 अशीच भावनिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा
राजकीय, सामाजिक, ग्रामीण आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.
संबंधित बातम्या










