वाशिम/नारायणराव आरु पाटील
वाशिम जिल्ह्यातील ४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. कारण, अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेतील थेट लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनुदान रक्कम वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.
प्रशासन सध्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु ठेवत असून ई-केवायसी अपूर्ण असल्यास वितरणात विलंब होत आहे. महाऑनलाईन साईट वेगाने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे तहसीलदारांनी आवाहन केले आहे.












