हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले! ई-केवायसी न केल्यास रक्कम मिळणार नाही – तहसीलदारांचा तातडीचा इशारा.

On: December 7, 2025 9:09 PM
Follow Us:
४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अडकले, ई-केवायसी प्रक्रिया करताना शेतकरी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम/नारायणराव आरु पाटील 

वाशिम जिल्ह्यातील ४१५७ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. कारण, अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेतील थेट लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनुदान रक्कम वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.

प्रशासन सध्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु ठेवत असून ई-केवायसी अपूर्ण असल्यास वितरणात विलंब होत आहे. महाऑनलाईन साईट वेगाने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे तहसीलदारांनी आवाहन केले आहे.

आजच ई-केवायसी पूर्ण करा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment