चिखली | विशाल गवई
चिखली तालुक्यातील उत्रादा येथे ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप करत गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला. अर्धवट रस्ता, मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काही प्रमाणात काम करण्यात आले असले तरी मध्यभागी असलेला मुख्य रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण मार्ग चिखलमय बनला असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलातून पायी चालावे लागत असून अनेक वेळा घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पालकांनी सांगितले. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.
वारंवार तक्रारी करूनही काम पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेराव घालत तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी बातम्या मिळवण्यासाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.
Related News
- ➡️ शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
- ➡️ लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! आषाढी एकादशीला 26 वस्तूंचे किट; एकनाथ शिंदे यांनी सांगितली संपूर्ण माहिती
- ➡️ चिखली पोलिसांची मोठी कारवाई! MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, दोघांना 3 महिन्यांसाठी तडीपार










