नारायणराव आरु|१८ एप्रिल २०२६
ही भाडेवाढ मुख्यतः साध्या बससेवांसाठी लागू करण्यात आली आहे. लाल परी, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा यांचा यात समावेश आहे. मात्र शिवशाही, शिवनेरी, जनशताब्दी, हिरकणी, शयनयान आणि ई-बस या प्रीमियम सेवांना या वाढीतून वगळण्यात आले आहे.
नवीन दरानुसार प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा 12 रुपये, तर लहान मुलांसाठी 7 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ST Ticket Price वाढल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 90 ते 100 रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे.
दरम्यान, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांसारख्या सवलतधारकांना या अधिभारातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सामान्य प्रवाशांवर आर्थिक ताण वाढणार आहे.
गर्दीच्या हंगामात तात्पुरती भाडेवाढ करण्याची परवानगी असल्याने दरवर्षी असा निर्णय घेतला जातो. मात्र मागील वेळी नागरिकांच्या विरोधामुळे अशी वाढ मागे घेण्यात आली होती.
सध्या रिठद ते वाशीम प्रवासासाठी 42 रुपये भाडे आकारले जात असून यापूर्वी हेच भाडे 36 रुपये होते. त्यामुळे या ST Bus Fare Increase मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात या निर्णयावर काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 तुमचे मत काय?
एसटी भाडेवाढ योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
🔗 संबंधित बातम्या
- धक्कादायक! RBI कडून एका बँकेवर 6 महिन्यांचे कडक निर्बंध – पैसे काढायलाही बंदी
- Maharashtra Heatwave Alert: अकोल्यात 43.8°C, उद्यापासून उष्णतेचा धोकादायक कहर!
- महिलांबाबत सीमारेषा ओलांडली? सुबोध सावजी यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाचा स्फोट
📢 KattaNews.in वर अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी भेट देत रहा.










